Advertisement

कोरोनामुळे १० वी, १२ वी परीक्षा देऊ न शकणाऱ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा

२९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची तर १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ दरम्यान होईल. या परीक्षेला विद्यार्थी बसू शकला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे.

कोरोनामुळे १० वी,  १२ वी परीक्षा देऊ न शकणाऱ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा
SHARES

राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने एका महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे १० व १२ चे जे विद्यार्थी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना आणखी एका संधी म्हणून जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

२९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची तर १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ दरम्यान होईल. या परीक्षेला विद्यार्थी बसू शकला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे.

संबंधित विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहात असलेला भाग सील केला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची परीक्षा देता येणार नाही. त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे.

कोरोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यी शिकत असलेल्या शाळा आणि महाविद्यालयातच होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. पण प्रात्यक्षिक परीक्षेत काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

दहावी आणि बारावीच्या ८० गुणांच्या पेपरसाठी तीन तासांचा वेळ दिला जातो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ४० आणि ५० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना एकूण १ तासासाठी २० मिनिटांप्रमाणं वेळ वाढवून देण्यात येईल.

 कोरोनामुळे १० वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षिक परीक्षाऐवजी विशिष्ट लेखन कार्य म्हणजे असाईनमेंट द्यावे लागतील. असाईनमेंट सादर करण्यासाठी २१ मे १० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर १२ वी साठी प्रात्याक्षिक परीक्षा २२ मे ते १० जून दरम्यान होईल. १२ वी विज्ञान शाखेच्या प्रात्याक्षिकांची संख्यादेखील कमी करण्यात आली आहे.

 कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर १५ दिवसांमध्ये असाईनमेंट सादर करावी लागणार आहेत. असाईनमेंट किंवा प्रात्याक्षिक परीक्षा देताना विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबात कुणाला कोरोना झाल्यास त्यांना १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.



हेही वाचा - 

सनराईस रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा