विद्या बालन अभिनित कहानी हा चित्रपट तुमच्या चांगला लक्षात असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. आपल्या बेपत्ता असलेल्या नवऱ्याला शोधणाऱ्या विद्या बाग नावाच्या गरोदर महिलेची भूमिका विद्या बालननं साकारली होती. आता सुजॉय घोष 'कहानी ३' घेऊन यायच्या विचारात आहे. एवढंच नाही तर त्यानं 'कहानी ४'ची पण घोषणा केली.
कहानी चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक सुजॉय घोषनं 'कहानी २' हा सीक्वेलसुद्धा आणला. सस्पेन्स थ्रिलर प्रकारचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. आता कहानीचा तिसरा भाग प्रदर्शित होतोय की काय? असंच सुजॉय घोषच्या ट्वीट वाचून जाणवेल. या संदर्भातच सुजॉय घोषनं एक गमतीदार ट्वीट करत 'कहानी ३'ची कहाणीसुद्धा सांगितली.
kahaani3 will be bidya bagchi finding vodaphone network. it might run into kahaani4 also...
— sujoy ghosh (@sujoy_g) November 20, 2019
'कहानी 3 मध्ये विद्या बागची व्होडाफोनच्या नेटवर्कचा शोध घेताना दिसेल.... कदाचित यासाठी कहानी 4 असा आणखी एक भागसुद्धा निघेल...' अशा अर्थाचं उपहासपूर्ण ट्वीट सुजॉय घोषनं केलं आहे. मोबाईल नेटवर्कला कंटाळून असं उपहासात्मक ट्वीट करत सगळ्यांचीच फिरकी घेतली. त्याला नेटिझन्सनीसुद्धा तसंच प्रत्युत्तर दिलं.
Sir the company is going bankrupt. They gonna disappear just like her husband soon.
— Pankaj Kumar Mandal (@Panky_25) November 20, 2019
🤣🤣🤣🤣🤣 sir banalo blockbuster hogi
— Shubhrika 🇮🇳 (@shubhrika17) November 20, 2019
Completely agree , it can be even titled KAHANI TILL ETERNITY as u can never get vodafone @VodafoneIN connectivity
— Prem Bhadauria (@premlovebank) November 20, 2019
before u complete kahani3 bidiya bagchi has not to find vodaphone network but she has to find vodaphone company itself😉
— vasim47 (@vasim471) November 20, 2019
हेही वाचा