अरबी समुद्रातील दक्षिण-पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील २४ तासांत त्याचं चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. या वादळाचं नाव तौंते असं ठेवण्यात आलं आहे. या वादळाचा प्रभाव १५ ते १७ मे असा ३ दिवस दिसणार आहे.
परिणामी कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर १६ आणि १७ मे रोजी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये या वादळाचा प्रभाव दिसेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
A depression has formed over Lakshadweep area. To intensify further into a cyclone during next 24 hours and move towards Gujarat coast. For more information kindly visit www. https://t.co/w8q0AaMm0I or https://t.co/KLRdEFp9rJ pic.twitter.com/LHxf0WoQLy
— India Meteorological Department (@Indiametdept) May 14, 2021
समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना किनाऱ्यावर येऊन आपल्या बोटी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
हेही वाचा- सावधान! राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे, हवामान खात्याचा इशारा