Advertisement

अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर मान्सून दाखल, महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांना अलर्ट

पुढच्या दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर मान्सून दाखल, महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांना अलर्ट
SHARES

मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर दाखल झाला आहे. तर पुढच्या दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीसह राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

16 ते 19 मे दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. तसंच कोल्हापूर, सातार, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्रात यंदा वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. अंदमान आणि निकोबार बेटांवर 15 मे रोजी पहिला हंगामी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे आज मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात दाखल झाला.

केरळमध्ये मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होतो. परंतु, यंदा वेळेआधी म्हणजे 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली होती. मात्र, पुढच्या दोन दिवसात केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने आता वर्तवली आहे.



हेही वाचा

वेळेआधीच दाखल होणार मान्सून, हवामान खात्याचा अंदाज

आदित्य ठाकरेंचा महत्त्वकांक्षी प्रकल्प बारगळला, पवईत सायकल ट्रॅकला नकार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा