वांद्रे - दिवाळी सणानिमित्त मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी खारदांडामधील रहिवाशांना भेटवस्तू दिल्या. या भेटवस्तू 28 ऑक्टोबरपर्यंत दिल्या जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. यामध्ये रवा, साखर, मैदा, चणा डाळ आणि पोहे दिले जात असून या सर्व वस्तू फक्त 200 रुपये किलो दराने मिळत आहेत. या वेळी आशिष शेलार यांच्यासह उमेश तांबे, इरफान पिंढारा, आसिफ खान, सरफराज खान आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.