दीड दिवसांच्या घरगुती गणपतींच्या इको फ्रेंडली विसर्जनासाठी महापौर स्नेहल आंबेकर यांनी कृत्रीम तलावाची निर्मिती केली. या ठिकाणी अनेक भक्तांनी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन केले. केवळ इको फ्रेंडली बाप्पा नाही, तर बाप्पाचे विसर्जनही इको फ्रेंडली व्हावे अशी भक्तांची इच्छा होती. यासाठी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी समस्त मुंबईकरांचा हा प्रश्न मिटवला. त्यांनी महापौर बंगल्यातच गणपती विसर्जनासाठी कृत्रीम तलावाची सोय केली.