पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारनं केवळ २५ लोकांना परवानगी दिली आहे. सरकारच्या या मार्गदर्शक सूचनांबाबत मुस्लिम समाजानं नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात शाळा, महाविद्यालये आणि मॉल उघडले जातात, राजकीय पक्ष मोठे कार्यक्रम आयोजित करत असतात, तेव्हा ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या जुलूसमध्ये फक्त ५ वाहनं आणि २५ लोकांना परवानगी देणं हे अयोग्य आहे, अशी नाराजी मुस्लिम समाजानं व्यक्त केली.
‘या’ आहेत मार्गदर्शक
यासंदर्भात रजा अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी म्हणाले की, राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीत ५ ट्रकला परवानगी देण्यात आली आहे.
प्रत्येक ट्रकमध्ये फक्त ५ लोक चढू शकतात. अशा प्रकारे २५ लोकांना संपूर्ण जुलूसमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयानं १० ट्रक आणि १५० लोकांना सहभागी होण्याची परवानगी दिली होती.
ते म्हणाले की, आपण आपल्या मागणीवर ठाम आहोत. उच्च न्यायालयाने किमान जास्तीत जास्त लोकांना चेहल्लूम जुलूसमध्ये सहभागी होण्याची परवानगी द्यायला हवी होती. नूरी म्हणाले की, त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबतचे निवेदनही दिले आहे. त्यांना आशा आहे की सोमवारपर्यंत राज्य सरकार आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करेल.
हेही वाचा