राज्यातील कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत आहे. राज्यात शुक्रवारी कोरोनाचे १५,८१७ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ११,३४४ रुग्ण बरे झाले आहेत.आतापर्यंत २१,१७,७४४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
आतापर्यंत राज्यात ५२ हजार ७२३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यू दर २.३१ टक्के आहे. राज्यात आता १,१०,४८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७९ टक्के झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७३,१०,५८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,८२,१९१ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४२,६९३ व्यक्ती गृहविलगीकरणा मध्ये आहेत. तर ४ हजार ८८४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.