राज्यात कोरोना रुग्णसंख्या आता घटत असल्याचं दिसून येत आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणाही वाढलं आहे. रविवारी राज्यात कोरोनाचे नवीन ४८ हजार ४०१ रुग्ण आढळले. तर ६० हजार २२६ रुग्ण बरे झाले आहेत.
रविवारी ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ७५ हजार ८४९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ४४ लाख ७ हजार ८१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं रुग्ण बरे होण्याचे बरे ८६.०४ टक्के झालं आहे.
रविवारी मुंबईत २४०३ कोरोनाचे रुग्ण आढळले. तर ३३७५ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१ टक्के झालं आहे. मुंबईत ५१ हजार १६५ अॅक्टिव्ह रुग्ण
आहेत.
महाराष्ट्रात सध्या ६ लाख १५ हजार ७८३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात सध्या १ लाखांच्यावर अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९४,३८,७९७प्रयोगशाळा नमुन्यांपैकी५१,०१,७३७ (१७.३३टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६,९६,८९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
१ मुंबई मनपा २,३९५
२ ठाणे ५५८
३ ठाणे मनपा ४१२
४ नवी मुंबई मनपा २७८
५ कल्याण डोंबवली मनपा ५३९
६ उल्हासनगर मनपा ३२
७ भिवंडी निजामपूर मनपा ३५
८ मीरा भाईंदर मनपा २०७
९ पालघर ४६६
१० वसईविरार मनपा ९९६
११ रायगड ८१८
१२ पनवेल मनपा २४९
१३ नाशिक १,०७३
१४ नाशिक मनपा १,९७९
१५ मालेगाव मनपा ६
१६ अहमदनगर २,६१८
१७ अहमदनगर मनपा ३७९
१८ धुळे १९७
१९ धुळे मनपा १२३
२० जळगाव ८२४
२१ जळगाव मनपा ३६
२२ नंदूरबार २३२
२३ पुणे ३,४४०
२४ पुणे मनपा २,११०
२५ पिंपरी चिंचवड मनपा १,८३०
२६ सोलापूर १,९०४
२७ सोलापूर मनपा २४३
२८ सातारा २,२८०
२९ कोल्हापूर १,७२८
३० कोल्हापूर मनपा ३२०
३१ सांगली १,५७२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २४४
३३ सिंधुदुर्ग ५९७
३४ रत्नागिरी ९४१
३५ औरंगाबाद ५८३
३६ औरंगाबाद मनपा २८८
३७ जालना ५६३
३८ हिंगोली २०१
३९ परभणी ३८१
४० परभणी मनपा १३०
४२ लातूर मनपा १७५
४३ उस्मानाबाद ६००
४४ बीड १,२६६
४५ नांदेड २४०
४६ नांदेड मनपा १०१
४८ अकोला मनपा १९३
४९ अमरावती ७५२
५० अमरावती मनपा १९९
५१ यवतमाळ १,०७२
५२ बुलढाणा १,०८७
५३ वाशिम ६५२
५५ नागपूर मनपा १,७८४
५६ वर्धा ९०९
५७ भंडारा ४१५
५८ गोंदिया ६०९
५९ चंद्रपूर १,२३५
६० चंद्रपूर मनपा ५२०
६१ गडचिरोली ३९०