Advertisement

कोरोनाने बीएमसीच्या ७० कर्मचाऱ्यांचा मृत्यू

महानगरपालिकेचे कर्मचारी कोरोना संकटात त्यांच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या १७८७ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाने बीएमसीच्या ७० कर्मचाऱ्यांचा मृत्यू
SHARES

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईत साडेपाच हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मुंबई महापालिकेच्या ७० कर्मचार्‍यांचा बळी गेला आहे. पालिकेचे अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, सुरक्षा रक्षक, अग्निशमन दल आणि सफाई कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

महानगरपालिकेचे कर्मचारी कोरोना संकटात त्यांच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या १७८७ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील १०५० कर्मचारी बरे होऊन घरी गेले आहेत. पालिकेच्या ७३७ कर्मचार्‍यांवर अद्यापही विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिकेच्या प्रत्येक विभागातील कर्मचार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. त्यात स्वच्छता विभाग, सुरक्षा, अग्निशमन दल, पाणीपुरवठा, कचरा विभाग यासह इतर विभागांचे कर्मचारी आहेत. आपत्ती नियंत्रण कक्षातील एक डझन कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे.

गेल्या ७ दिवसांत कोरोनामुळे १५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून हे महापालिकेचे सर्वात मोठे नुकसान आहे.  ९ जूनपर्यंत पालिकेच्या १७१२ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली. त्या काळात ५५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. १०४२ कर्मचारी बरे झाले असून ६७० जणांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय अग्निशमन दलाच्या ८ जवानांच्या मृत्यूबरोबरच कोरोना संसर्गामुळे ७ सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे. तर ३६ सुरक्षा रक्षक रुग्णालयात दाखल आहेत.



हेही वाचा -

जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात ८२ टक्के प्रवासी घट

एसटी कामगारांचा सामुहीक रजेवर जाण्याचा इशारा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा