Advertisement

कोरोनाचा संसर्ग वाढतोय, केंद्राचं ‘या’ ५ राज्यांना पत्र

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढतोय, केंद्राचं ‘या’ ५ राज्यांना पत्र
SHARES

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये राज्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेण्यास सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करत आरोग्य मंत्रालयानं याबाबत आवश्यक पाऊलं उचलण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय राज्यांनाही सतर्क राहण्याचा सूचना ही देण्यात आल्या आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोना संसर्गात सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि इतर काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण झपाट्यानं पाहायला मिळत आहे.

कोरोना संसर्ग वाढल्यामुळे याआधीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहित, आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या पत्रामध्ये कोरोना निर्बंध लागू करण्याच्या तसेच लसीकरावर अधिक भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६०० हून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे तिथला कोरोना रुग्ण सकारात्मकता दर ७ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. मागील ४ आठवड्यांपासून दिल्लीमध्ये सातत्यानं रुग्ण वाढत आहेत. सकारात्कमकता दर १ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर पोहोचला आहे.



हेही वाचा

मुंबईतील ९९ टक्के आरोग्यसेवा, फ्रंटलाईन वर्कर्समध्ये सर्वाधिक अँन्टिबॉडिज

मुंबईतील कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबद्दल राजेश टोपे म्हणाले...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा