Advertisement

पुढील वर्षापर्यंत मास्क घालणं बंधनकारक


पुढील वर्षापर्यंत मास्क घालणं बंधनकारक
SHARES

मुंबईसह देशभरातून अद्याप कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. अनेक भागात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळं पुढील वर्षापर्यंत मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. याबाबत निती आयोगाने केंद्र सरकारच्या प्रश्नावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी कोरोना नियम पाळणे आवश्यक आहे आणि मास्क घालणेही बंधनकारक आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी लसीबरोबरच मास्कही तितकाच महत्वाचा आहे. अनेक नागरिक विनामास्क रस्त्यांवरून फिरताना दिसत आहेत. दरम्यान, मास्कपासून सध्यातरी सुटका होणार नसल्याचं स्पष्टीकरण निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी केले आहे. केंद्र सरकारने याबाबत निती आयोगाला प्रश्न विचारला असता, त्यांनी सध्यातरी मास्कपासून सुटका होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुढील वर्षापर्यंत मास्क बंधनकारक असून, सोशल डिस्टसिंग पाळण्याचं आवाहनही त्यांनी केल आहे.

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती. आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. महाराष्ट्र राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले होते. सध्या धोका कमी असला तरी सण, उत्सवात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे.

कोरोनाने अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र दिसत आहे. परंतु, तरी देखील तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळं नागरिकांनी नियम पाळणे गरजेचे आहे. अनेक नागरिक सध्या २ लसी घेतल्यामुळे नियम पायदळी तुडवत असल्याचे दिसत आहे. अनेकजण मास्कचा देखील वापर करत नसल्याचे पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर निती आयोगानेही मास्क बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारनंही २ डोस घेतले तरी मास्क बंधनकारक आहे, असे स्पष्ट केलं आहे. ज्यांनी २ लस घेतल्या असतील तरी मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे गरजेचे आहे. सध्या तरी तोंडावरचा मास्क हटणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा