Advertisement

मुंबईत कोरोनाचे ७१७ नवे रुग्ण, ५५ जणांचा दिवसभरात मृत्यू

मंगळवारी दिवसभरात २४६७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ८४ हजार ४११ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे ७१७ नवे रुग्ण, ५५ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात आज कोरोनाने २८१ जणांचा बळी घेतला. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ७१७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ३२० रुग्ण

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५५ रुग्ण दगावले आहेत. तर २६ जुलै रोजी ५७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २७ जुलै रोजी एकूण ३९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ७१७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख१० हजार  ८४६ इतकी झाली आहे. तर मंगळवारी दिवसभरात २४६७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ८४ हजार ४११ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- Electricity Bill: अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

राज्यात आज १० हजार ३३३ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले आहे. आज देखील नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३२ हजार २७७ झाली आहे. तर आज ७७१७ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४४  हजार ६९४  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १९ लाख ६८ हजार ५५९ नमुन्यांपैकी ३ लाख ९१  हजार ४४० नमुने पॉझिटिव्ह (१९.८८ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८५ हजार ५४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ७३३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे.

हेही वाचाः- महाराष्ट्र बोर्डाचा १० वीचा निकाल उद्या होणार जाहीर

आज निदान झालेले ७७१७ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २८१ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७०० (५५), ठाणे- १४७ (३), ठाणे मनपा-१९१ (६),नवी मुंबई मनपा-३३५ (१२), कल्याण डोंबिवली मनपा-२१९ (१६),उल्हासनगर मनपा-४३ (२), भिवंडी निजामपूर मनपा-३८ (१), मीरा भाईंदर मनपा-९६ (५), पालघर-८७, वसई-विरार मनपा-१०१ (२), रायगड-१६१ (१८), पनवेल मनपा-१०५ (१), नाशिक-१२२ (१), नाशिक मनपा-२५३ (१०), मालेगाव मनपा-८, अहमदनगर-१७७ (२), अहमदनगर मनपा-४१ (१), धुळे-११४ (१), धुळे मनपा-१०६, जळगाव-३१२ (१२), जळगाव मनपा-५७ (१), नंदूरबार-४६ (१), पुणे- ३४० (१२), पुणे मनपा-११८२ (२३), पिंपरी चिंचवड मनपा-६७३ (१२), सोलापूर-१६१ (२१), सोलापूर मनपा-६२ (४), सातारा-१३३ (८), कोल्हापूर-१०२ (३), कोल्हापूर मनपा-२७ (३), सांगली-२७ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१०२ (१), सिंधुदूर्ग-१ (१), रत्नागिरी-६३, औरंगाबाद-७८ (२), औरंगाबाद मनपा-५७६ (४), जालना-५५ (१), हिंगोली-५, परभणी-१८, परभणी मनपा-१० (१), लातूर-४४ (४), लातूर मनपा-५३ (१), उस्मानाबाद-१५ (४), बीड-३७, नांदेड-३, नांदेड मनपा-३, अकोला-४५, अकोला मनपा-२३ (१), अमरावती-३२, अमरावती मनपा-२६ (२), यवतमाळ-१८ (१), बुलढाणा-७५ (१), वाशिम-६, नागपूर-७९ (७), नागपूर मनपा-१२३ (११), वर्धा-२०, भंडारा-१, गोंदिया-३, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-७, गडचिरोली-६, इतर राज्य ७.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा