महाराष्ट्रात (maharashtra) सोमवारी नवीन कोरोना (coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दिवसभरात कोरोनाचे ६ हजार ४७० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १० हजार ८१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसंच १०१ रुग्णांचा मृत्यू (death) झाला आहे.
राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका झाला आहे. तर आतापर्यंत एकूण ५८ लाख ०० हजार ९२५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्क्यांवर पोहोचले आहे.
मुंबईत सोमवारी ६०८ रुग्ण आढळले. तर ७१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ९४ हजार ७९६ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ८ हजार ४५३ रुग्ण सक्रिय आहेत. रुग्ण दुप्पटीचा वेग ७२८ दिवसांवर पोहोचला आहे. तर २१ जून ते २७ जून दरम्यान रुग्णवाढीचा दर हा ०.०९ टक्के राहिला आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ८७४ झाली आहे. पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १७ हजार ०४२ आहे. ठाण्यात १६ हजार १४१ तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ८७५ आहे. सांगलीत ही संख्या ९ हजार ६१२, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ६६२, रत्नागिरीत ५ हजार २३२, रायगडमध्ये ५ हजार ५६१, सिंधुदुर्गात ५ हजार २०१, तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार २७१ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार १८५ इतकी आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
हेही वाचा -
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी-विरार मार्गावरील प्रवाशांना दिलासा!