Advertisement

...नाहीतर पुन्हा लॉकडाऊन लावणार, राजेश टोपे यांचे मोठे विधान

महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीवर आरोग्य मंत्र्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लॉकडाऊन संदर्भात मोठी घोषणा केली.

...नाहीतर पुन्हा लॉकडाऊन लावणार, राजेश टोपे यांचे मोठे विधान
SHARES

ऑक्सिनच्या अनुषंगानं राज्यातील लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार आहे. ज्या दिवशी ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल, त्या दिवशी राज्यात लॉकडाऊन करण्यात येईल, असं मोठे विधान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीवर आरोग्य मंत्र्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असला तरी भय नाही. पण काळजी घेतली पाहिजे. या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही सण आणि नवीन वर्षाचं स्वागत निश्चित करा. पण निर्बंधाचंही पालन करा. राज्यात आधी ५०० ते ६०० रुग्ण सापडत होते. आता ही रुग्णसंख्या १४०० वर गेली आहे. त्यात ओमिक्रॉनचे रुग्णही १००च्या घरात गेले आहेत. त्याची गती वाढली आणि आता जर लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य मंत्री टोपे यांनी केलं आहे.

ऑक्सिजनच्या अनुषंगानं आपण लॉकडाऊन ठरवणार आहोत. ज्या दिवशी ८०० मॅट्रिक टन ऑक्सिजन लागेल, त्या दिवशी लॉकडाऊन लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची ८०० मॅट्रिक टनाची आवश्यकता ५०० मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत असल्याचं टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

मात्र, ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा तसा हेतू नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावं, असंही आवाहन टोपे यांनी केलं आहे.



हेही वाचा

भारतात 'या' तारखेपासून देणार बूस्टर डोस, पंतप्रधान नरेंद्र मोदीची घोषणा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा