महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेवरील भार वाढत आहे. हाच भार कमी करण्यासाठी आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. सरकारला मदत म्हणून हॅल्पनाऊ हा एक उपक्रम सुरू केला आहे.
दिवसाला ७० हजाराहून हून अधिक लोकांचे जीव वाचवण्याच्या हेतूनं त्यांनी हेल्प नाऊची सुरुवात केली. मागील वर्षी महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी याची सुरूवात झाली.
डोमेन तज्ञांच्या माहितीसह गेल्या १५ महिन्यात हेल्पनाऊनं मुंबईत खासगी रुग्णवाहिकांचे सर्वात मोठे जाळे तयार केलं आहे. भारतात खरोखरच सर्वात सुरक्षित रुग्णवाहिका सेवा तयार करण्यासाठी तांत्रिक ऑप्टिमायझेशन या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
हेल्पनाऊ मुंबई, पुणे, दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये १५ ते २० मिनिटांत व्हेंटिलेटरसह स्वच्छ आणि सुसज्ज रुग्णवाहिका पुरवते. ते रुग्ण, आरोग्यसेवा, रुग्णालये, चाचणी लॅब आणि शासकीय संस्थांना हेल्पलाईन नंबर: 8899889952 किंवा वेबसाइटद्वारे https://www.gethelpnow.in/ द्वारे 24x7 नेटवर्क प्रवेश प्रदान करतात.
८८२२२२८८२२२ वर अम्ब्युलन्ससाठी कोणीही कॉल करू शकतो, त्यानंतर टेक प्लॅटफॉर्म आपल्याला जवळची मदत शोधेल. नंतर, रुग्णाला व्हॉट्सअॅप, एसएमएस आणि सर्व कॉल पाठवल्यानंतर ती एकदाच संबंधित रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवते.
अहवालानुसार, पूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागानं केलेल्या सर्वेक्षणात असं सुचवलं गेलं होतं की, एप्रिलमध्ये महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाव्हायरसची प्रकरणे ३ लाखांपेक्षा जास्त असू शकतात. जर अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषत: नागपूर आणि ठाणे इथं उपचारांची सुविधा उपलब्ध न झाल्यास.
हेही वाचा