कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी, धारावीतील कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. मात्र, दादर आणि माहीममधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे येथील चिंता वाढत चालली आहे.
मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. मुंबईतील कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत गेलं आहे. तर मुंबईच्या २४ विभागांपैकी १७ विभागातील कोरोना रुग्णावाढीचा वेग आता दीड टक्क्याच्या खाली आला आहे. यापैकी काही विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्याच्याही खाली आहे. सध्याच्या घडीला या १७ विभागांमध्ये १.३४ टक्क्याच्या सरासरीने रुग्ण वाढत आहेत. तर उर्वरित सात विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर २.५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
धारावी कोरोनामुक्तीकडे, अवघे 'इतके' आहेत अॅक्टिव रुग्ण
शंभरीतील आजोबांची कोरोनावर मात, रुग्णालयातच केला १०१ वा वाढदिवस साजरा