Advertisement

तीन वर्षांतच म्हाडाच्या इमारतींची दुरवस्था


SHARES

सायन - पिलरला तडे, घरातल्या भिंतींना तडे, पाण्याची टाकी आणि ड्रेनेज लाईनला गळती. ही दुरवस्था आहे प्रतिक्षानगरमधील म्हाडाच्या चैतन्य इमारतीची. अवघ्या तीन वर्षांपूर्वी या रहिवाशांना इमारतीचा ताबा मिळाला. पण तीन वर्षातच इमारतीची ही अवस्था झालीय. या घरांसाठी 2011 मध्ये सोडत निघाली आणि 2013 पासून घरांचा ताबा देण्यास सुरुवात झाली. ताबा मिळाल्याच्या दिवसापासूनच इथल्या समस्यांना सुरुवात झाली. इथली सर्वात मोठी समस्या म्हणजे संरक्षण भिंतीची. या इमारतीला अर्धवटच संरक्षण भिंत आहे. संरक्षण भिंत बांधून देण्यासाठी रहिवासी गेल्या तीन वर्षांपासून म्हाडाच्या पायऱ्या झिजवत आहेत. पण प्रतिसाद मात्र शून्य.

या इमारतीच्या समस्यांविषयी मुंबई लाइव्हनं म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांच्याशी संपर्क साधला. "माझ्यापर्यंतही चैतन्य सोसायटीचा विषय आला आहे. यासंबंधी लवकरच कार्यवाही करून हा विषय मार्गी लावला जाईल, असे आश्वासन झेंडे यांनी दिले. म्हाडाच्या इमारतींचं बांधकाम करणाऱ्या बी. जी. शिर्के कंपनीच्या बांधकामाच्या दर्जावर अनेक वर्षांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे म्हाडाची घरं स्वस्त असली तरी बांधकामाच्या दर्जावरून म्हाडाला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा