Advertisement

मुंब्रा बायपास रोड आठवडाभरात खुला होण्याची शक्यता

ठाणे-बेलापूर मार्गावरील मुंब्रा बायपासच्या बांधकामामुळे नवी मुंबईत प्रचंड वाहतुक कोंडी झाली आहे.

मुंब्रा बायपास रोड आठवडाभरात खुला होण्याची शक्यता
(File Image)
SHARES

ठाणे-बेलापूर (टीबी) मार्गावरील मुंब्रा बायपासच्या सुरू असलेल्या बांधकामामुळे नवी मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ज्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. पण लवकरच ही समस्या दूर होणार आहे. कारण बायपास प्रकल्प आठवडाभरात पूर्ण होईल, असा अंदाज आहे. 

रहदारीला कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक म्हणजे जड वाहनांना रात्री 10 वाजल्यापासून टीबी रोडवरून प्रवास करण्याची परवानगी. यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीत लक्षणीय वाढ झाली आहे. सायन-पनवेल महामार्गावरही (पर्यायी मार्ग) अवजड वाहतूक होत आहे.

बायपास बांधकाम सुलभ करण्यासाठी, शिळ फाट्यावरून वाहतूक TTC MIDC परिसरातून ठाणे-बेलापूर मार्गाकडे वळवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सायन-पनवेल महामार्गाचा उपयोग कळंबोली जंक्शन ते मुंब्रा पर्यंत वाहतुकीसाठी वळसा म्हणून केला जात आहे. मात्र, या वळणांमुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर ताण आणखी वाढला आहे.

मुंब्रा बायपास सार्वजनिक वापरासाठी खुला झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येत  दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. बायपास प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे रबाळे आणि महापे परिसराला विशेष फायदा होणार आहे. वाहतूक कोंडीचा त्यांना मोठा फटका बसला आहे.

याशिवाय, बायपास रोड सुरू केल्याने वाशी खाडी पुलावरील अवजड वाहतूकही कमी होईल, असा अंदाज आहे.



हेही वाचा

नवी मुंबई विमानतळ 2024 पर्यंत सुरू होईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जूनच्या मध्यापर्यंत गांधीनगर उड्डाणपूल उघडण्याची शक्यता

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा