मुंबई - मुंबईच्या लोकलमधील गर्दीला सगळेच वैतागलेले आहेत. याच मध्य रेल्वेवरील परिस्थितीवर बोट ठेवत कोर्टानं पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या मुली लग्नासाठी मध्य रेल्वेच्या मुलांना पसंती देत नसल्याचं म्हटलंय. रेल्वेचे अपघात, दुर्घटना या मुद्द्यावरून रेल्वे प्रशासनाला कोर्ट कायम फैलावर घेत असतं. आताही कोर्टानं मध्य रेल्वेचे कान उपटले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तरूणाईच्या मनातील या भावना ओठांवर आल्या आहेत.