चहाप्रेमींसाठी चहा म्हणजे अमृत आहे. दिवसाची सुरुवात चहानं केली नाही तर त्यांचा दिवसच पूर्ण होणार नाही. सकाळी उठलं की चहा, झोप येत असेल तरी चहा, कंटाळा आला असेल तरी चहा असं करत दिवसातून पाच ते सहा वेळा तर चहा होतोच होतो.
पण अमृततुल्य समजणारा चहा तुमच्यासाठी विषकारक आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? चहाच्या अतिरेक सेवनामुळे शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, याची तुम्हाला कल्पनाही नसेल. डॉक्टरांच्या मते दिवसातून जास्तीत जास्त दोन कप चहा घ्यावा. पण इथं अनेकांचं दिवसातून सहा ते सात वेळा चहा घेतला जातो. आज आम्ही तुम्हाला चहापासून होणारे विपरित परिणाम सांगणार आहोत.
चहाच्या अतिरिक्त सेवनामुळे झोप न येणे, निद्रानाश असे विकार उद्भवू शकतात.
मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा चहातील घटकांमुळे परिणाम होऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला डाययुरेसिसचा त्रास होऊ शकतो. डाययुरेसिस म्हणजे शरीरात जास्त प्रमाणात लघवी तयार होते.
जास्त प्रमाणात चहा घेतल्यानं तुमच्या शरीराची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
जेव्हा तुमच्या शरीरात डिहायड्रेशन होते तेव्हा शरीर अतिरिक्त पाणी साठवून ठेवू लागते आणि तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटते.
चहाच्या अतिरेकी सेवनामुळे आपल्या शरीराची शोषून घेण्याची क्षमता कमी होते त्यामुळे अन्नातून शरीराला मिळालेले पोषक घटक नीटपणे शोषून घेतले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे शरीरात अत्यावश्यक पोषक घटकांची कमतरता तयार होते.
अनेकांना ब्लॅक टी पिण्याची सवय असते. आरोग्यासाठी फायदेशीर असते म्हणे. पण ती प्रमाणात घेतली तरच फायदेशीर आहे. प्रमाणाच्या बाहेर ब्लॅक टीचे सेवन केल्यास शरीरात लोहाची कमतरता तयार होते.
चहाच्या झाडात म्हणजेच कॅमेलिया सेंसेस (Camellia sinensis) या झाडात नैसर्गिकपणे कॅफिन आढळते. त्यामुळे चहा या पेयात सुद्धा काही प्रमाणात कॅफिन असते. गरम पाण्यात उकळणे आणि मुरण्यासाठी ठेवून देणे यामुळे चहामध्ये कॅफिन जास्त प्रमाणात उतरते.
चहाच्या झाडात अमिनो असिड असते. यामुळेच डोके शांत आणि रिलॅक्स झाल्याची भावना येते. म्हणूनच चहा घेतल्यावर आपल्याला बरे वाटते.
चहात असलेल्या कॅफिनमुळे चहाची सवय लागते. सवयीचे हळूहळू व्यसनात रूपांतर होते. म्हणूनच ठरलेल्या वेळेला चहा मिळाला नाही तर डोके दुखते, अस्वस्थ वाटते, चिडचिड होते.
जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने चिंता आणि अस्वस्थता असे मनोविकार मागे लागतात. झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे अस्वस्थता वाढते आणि शरीराचे सगळे चक्रच बिघडते.
ज्यांना हृदयासंबंधित काही समस्या आहेत त्यांनी तर चहाचे अतिरिक्त सेवन टाळणेच योग्य आहे. कारण चहामध्ये असलेले कॅफिन हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नाही.
चहाप्रेमींसाठी चहा म्हणजे अमृत आहे. दिवसाची सुरुवात चहानं केली नाही तर त्यांचा दिवसच पूर्ण होणार नाही. सकाळी उठलं की चहा, झोप येत असेल तरी चहा, कंटाळा आला असेल तरी चहा असं करत दिवसातून पाच ते सहा वेळा तर चहा होतोच होतो.
पण अमृततुल्य समजणारा चहा तुमच्यासाठी विषकारक आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? चहाच्या अतिरेक सेवनामुळे शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, याची तुम्हाला कल्पनाही नसेल. डॉक्टरांच्या मते दिवसातून जास्तीत जास्त दोन कप चहा घ्यावा. पण इथं अनेकांचं दिवसातून सहा ते सात वेळा चहा घेतला जातो. आज आम्ही तुम्हाला चहापासून होणारे विपरित परिणाम सांगणार आहोत.
हेही वाचा
उन्हाळ्यात थंडगार, रसदार कलिंगड खाण्याचे १२ फायदे