मुंबई - नरक चतुर्दशी अर्थात दिवाळीचा पहिला दिवस. या दिवसाला हिंदी भाषक काली चौदस असंही म्हणतात. पण इथे काली हा शब्द काळ्या रंगाची देवी, अशा अर्थानं येत नाही. काळ, हा त्यामागचा अर्थ आहे. काळाच्या उदरातल्या शक्तीला वंदन करण्याचा हा दिवस. काळाच्या उपासनेसाठी ओम भ्रीम नमः ओम भ्रीम नमः या मंत्राचा जपही केला जातो. या मंत्राच्या जपामुळे आणि एक दिवा यमराजासाठी लावल्यानं संपत्तीचा मार्ग खुला होतो आणि अकाली मृत्युचा धोकाही टळतो, असंही मानलं जातं.