Advertisement

मन उधाण वारामध्ये 'ही' आहे फ्रेश जोडी

रुपेरी पडद्यावर नेहमीच नवनवीन जोड्या जुळत असतात. आता ‘मन उधाण वारा’ या आगामी मराठी सिनेमात ही नवी जोडी रसिकांच्या मनाचा वेध घेणार आहे.

मन उधाण वारामध्ये 'ही' आहे फ्रेश जोडी
SHARES

रुपेरी पडद्यावर नेहमीच नवनवीन जोड्या जुळत असतात. आता ‘मन उधाण वारा’ या आगामी मराठी सिनेमात ही नवी जोडी रसिकांच्या मनाचा वेध घेणार आहे.

चित्रपटातल्या नव्या जोड्यांची चर्चा नेहमी होत असते. एखादी नवी जोडी येणार असेल तर प्रेक्षकही त्या जोडीची उत्सुकतेनं वाट पाहतात. मोनल गज्जर, ऋत्विज वैद्य ही अशीच एक नवी जोडी ‘मन उधाण वारा’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. ११ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि ‘लोका एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच ‘पेन मुव्हीज्’चे जयंतीलाल गडा यांची प्रस्तुती असलेला हा चित्रपट सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी दिग्दर्शित केला आहे.

गुजराती कौटुंबिक पार्श्वभूमी असललेली मोनल व मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये शिकलेला ऋत्विज यांचा मराठीशी तसा फारशा संबध नसल्यानं मन उधाण वारा’ हा चित्रपट त्यांच्यासाठी एक आव्हान होतं. मोनलनं याआधी गुजराती, तामिळ, तेलगू अशा बऱ्याच भाषांमध्ये काम केलं आहे, तर ऋत्विजनं काही हिंदी लघुपटांचं दिग्दर्शन व त्या लघुपटांमध्ये अभिनयही केला आहे. या कामाच्या बळावरच निर्माते सतीश कौशिक यांनी या दोघांची ‘मन उधाण वारा’ या चित्रपटासाठी निवड केली.

या जोडीचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. या अनुभवाबद्दल बोलताना मोनल व रित्विज म्हणाले की, आम्ही नेहमीच आशयसंपन्न भूmarathi-new-film-man-udhan-vara-in-Monal-Gajjar-and-Rutvij-Vaidyaमिकांना प्राधान्य दिलं असल्यानं हा सिनेमा मिळाला आहे. सतीशसरांची निर्मिती असलेल्या सिनेमात काम करणं ही आमच्यासाठी निश्चितच आनंदाची बाब होती. हा चित्रपट नात्यातील हळूवार क्षण रेखाटणारा असून, ‘फ्रेश जोडी’ असणं ही या चित्रपटाची गरज होती. त्यानुसार आमची निवड झाली. आम्ही दोघंही एकमेकांना तसे नवखे असलो तरी हे कला माध्यम आमच्यासाठी नवं नाही. त्यामुळं एकत्र काम करताना मजा आली. दिग्दर्शक संजय मेमाणे यांनी खूप छान पद्धतीनं समजावल्यानं एकमेकांच्या कृतीला मिळणाऱ्या प्रतिक्रियांचा सूर उत्तम जुळला होता.

मोनल आणि ऋत्विज या नव्या जोडीसह या चित्रपटात किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, डॉ. शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, ज्युलिया मोने, अनुराधा अटलेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. निशांत कौशिक, अक्षय गडा, धवल गडा चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत.



हेही वाचा -

ढाण्या वाघानं मारली दुसऱ्या मजल्यावरून उडी

सूनबाई येती घरा, तोची दिवाळी दसरा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा