Advertisement

सीबीआयचा रिपोर्ट अजून शिल्लक, इतक्या लवकर डीजे वाजवू नका- राणे

अजून सीबीआयचा अहवाल येण्याचं शिल्लक असून इतक्या लवकर डीजे वाजवू नका, असा सबुरीचा सल्ला भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला दिला आहे.

सीबीआयचा रिपोर्ट अजून शिल्लक, इतक्या लवकर डीजे वाजवू नका- राणे
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी दिल्लीतील एम्स रुग्णालयाने आपला अहवाल दिल्यापासून शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. सुशांत प्रकरणावरून महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यात आल्याचं म्हणत, शिवसेनेकडून माफीची मागणीही केली जात आहे. परंतु अजून सीबीआयचा अहवाल येण्याचं शिल्लक असून इतक्या लवकर डीजे वाजवू नका, असा सबुरीचा सल्ला भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला दिला आहे. 

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी AIIMS च्या अहवालानंतर शिवसेना उड्या मारायला लागली आहे. त्यांना वाटतं की या प्रकरणाचा निकाल लागला. बॉडी नसल्यामुळे फक्त उरल्यासुरल्या गोष्टींवर अहवाल द्यावा लागला. सीबीआयचा रिपोर्ट अजून बाकी आहे. अजून खूप काय बाकी आहे. एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

हेही वाचा - हा तर मुंबई पोलिसांच्या बदनामीचा कट- संजय राऊत

सुशांतचा पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करून अहवाल देण्याची विनंती सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे केली होती. त्यानुसार एम्स रुग्णालयाने डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम नेमली होती. त्यानुसार या टीमने सर्व शक्यतांचा विचार करून रिपोर्टचा अभ्यास केला. या अभ्यासानंतर सादर केलेल्या अहवालात, बॉम्बे टॉक्सिक सायन्स लॅब तसंच एम्स टॉक्सिकोलोजी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत सुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी पदार्थ आढळून आले नाहीत. सुशांतच्या शरीरावर गळफासशिवाय इतर कोणत्याही जखमा नव्हत्या. गळ्यावर असलेला डाग हा गळफासामुळेच होता. तसंच शरीर आणि कपड्यांची कुठलीही ओढाताण झालेली दिसली नाही. त्यामुळे हे प्रकरण गळफास लावून आत्महत्या केल्याचच दिसून येत असल्याचं डाॅ. सुधीर गुप्ता यांनी नमूद केलं आहे.

एम्सच्या अहवालानंतर ,अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात झाली, तेव्हा अगदी सुरूवातीपासूनच या प्रकरणात संशयास्पद वातावरण निर्माण करून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीचे प्रयत्न झाले. आता तर सीबीआयच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आम्ही तर नि:शब्द झालो आहोत. या प्रकरणावरून मीडिया ट्रायल करणाऱ्या वृत्त वाहिन्या राजकारण्यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची माफी मागितली पाहिजे. तसं होत नसेल, तर महाविकास आघाडी सरकारने त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला पाहिजे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा