Advertisement

'विधान परिषद बंद करा', भाजपच्याच आमदाराची मागणी


'विधान परिषद बंद करा', भाजपच्याच आमदाराची मागणी
SHARES

नरिमन पॉईंट - भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनीच विधान परिषद सभा बरखास्त करा, अशी मागणी केली आहे. यासाठी अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. पत्रात विधान परिषद बरखास्त करा, अशी मागणी केली आहे.

"देशातील केवळ 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. विधान परिषदेला घटनात्मक अधिकार नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांना मतदारांनी नाकारले असे प्रतिनिधी विधान परिषदेत येतात. विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह न राहता असा असंतुष्ट राजकारण्यांचाच अड्डा बनला आहे," असे अनिल गोटे म्हणाले. "आत्तापर्यंत विधान परिषदेमध्ये ग. दि. माडगुळकर, वसंत बापट, ना. धों. महानोर, मा. गो. वैद्य, वंसत देसाई या विद्वानांनी विधान परिषदेमध्ये मार्गदर्शन केले आहे. मात्र भूतकाळातील आदर्श पूर्णपणे संपुष्टात आला आहे. शासनाची कोंडी करणे, निवडणुकीतला वचपा विधान परिषदेत काढणे यासाठी विधान परिषदेचा वापर केला जातो. राज्य सरकारला स्थानिक विकास निधी, पगार, भत्ते, मोफत प्रवास, मोफत आरोग्य सेवा, विकास निधी यावर प्रतिवर्षी 300 कोटी खर्च होतो. यामुळे वायफळ खर्च बंद करून विधान परिषद बंद करावी," अशी मागणी अनिल गोटे यांनी केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा