Advertisement

१० दिवसांत २८ लाख ७२ हजार क्विंटल धान्याचं वाटप

महाराष्ट्रात १ ते १० एप्रिल दरम्यान १ कोटी ९ लाख ३० हजार शिधापत्रिकाधारकांना तब्बल २८ लाख ७२ हजार क्विंटल अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं आहे.

१० दिवसांत २८ लाख ७२ हजार क्विंटल धान्याचं वाटप
SHARES

महाराष्ट्रात १ ते १० एप्रिल दरम्यान १ कोटी ९ लाख ३० हजार शिधापत्रिकाधारकांना तब्बल २८ लाख ७२ हजार क्विंटल अन्नधान्याचं वाटप करण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (food and supply minister chhagan bhujbal) यांनी दिली. 

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचं (ration) सुरळीत वितरण सुरू आहे. राज्यात लाॅकडाऊनमुळे विविध भागात अडकलेल्या स्थलांतरीत ५ लाख ८ हजार २३६ शिधापत्रिकाधारकांना ते जेथे राहत आहेत त्याठिकाणी शासनाच्या पोर्टेबिलीटी यंत्रणेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य देण्यात आलं. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत पात्र रेशनकार्ड धारकाच्या नियमित स्वस्त धान्य (grain) खरेदीसोबत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एप्रिल ते जूनपर्यंत ५ किलो अतिरिक्त मोफत तांदूळ देण्यात आले. यासाठी भारतीय खाद्य निगम कडून ३ लाख ५० हजार ८२ मेट्रिक टन धान्य मिळाल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

रेशनिंग, पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह रेशन दुकानदार आपला जीव धोक्यात घालून काम करत असल्यामुळे भुजबळ यांनी या सर्वांचे आभार मानले. 

कोरोना पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील आरोग्य खात्यासोबतच अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी अत्यंत महत्वाची असून राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी कामाचा वेग वाढवून अन्नधान्याचे वाटप लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करावं, असे निर्देशही दिले. 


हेही वाचा -

... म्हणून ब्रिटनकडून ठाकरे सरकारचं कौतुक

Coronavirus Update: मुंबईत आता ड्रोनच्या माध्यमातून होणार निर्जंतुकीरण




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा