Advertisement

WHO चा इशारा खोटा ठरवायचा असेल तर, असं का म्हणाले अजित पवार ?

‘कोरोनाचा (coronavirus) खरा विनाश अजून दिसायचा आहे’, हा जागतिक आरोग्य संघटना (who) प्रमुखांनी दिलेला इशारा खोटा ठरवायचा असेल, तर नागरिकांनी तो गांभीर्यानं घेऊन सावध व्हावं.

WHO चा इशारा खोटा ठरवायचा असेल तर, असं का म्हणाले अजित पवार ?
SHARES

‘कोरोनाचा (coronavirus) खरा विनाश अजून दिसायचा आहे’, हा जागतिक आरोग्य संघटना (who) प्रमुखांनी दिलेला इशारा खोटा ठरवायचा असेल, तर नागरिकांनी तो गांभीर्यानं घेऊन सावध व्हावं. यापुढचे काही दिवस घराबाहेर न पडता टाळेबंदी (lockdown) नियमांचं पालन करावं. नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये, घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊन स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी केलं आहे.

मोठ्या प्रमाणात रुग्ण

मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात, मालेगावसारख्या शहरात कोरोनाग्रस्तांची (corona positive) संख्या गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यानं चिंता वाढली आहे. मुंबईत सोमवारी एका दिवसात ४५० हून अधिक रुग्ण वाढले. राज्यातील रुग्णांची संख्या साडेचार हजारांवर गेली आहे. २४ मार्चच्या आधीपासून टाळेबंदी जाहीर करुनही झालेली वाढ गंभीर आहे. मुंबईतील ५३ पत्रकार बांधवांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे, यातून कोरोनानं हातपाय कुठपर्यंत पसरले आहेत हे लक्षात येतं. 

हेही वाचा - लाॅकडाऊनच्या काळात पोलिसांवरील हल्ल्याच्या ११७ घटना

विनाकारण गर्दी सुरूच

तरीही शहरात रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये नागरिक विनाकारण गर्दी करत आहेत. यातून ते स्वत:च्या, कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत, हे थांबलं पाहिजे. घरातली व्यक्ती घराबाहेर जाणार नाही ही जबाबदारी आता कुटुंबातील महिलांनी, मुलांनी घेतली पाहिजे. घराबाहेर जाण्यापासून सर्वांना रोखलं पाहिजे, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी  केलं आहे.

साथ द्या

देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आपले डॉक्टर, आपले पोलिस, या सर्वांनी आपल्याला घराबाहेर न पडण्याचं, घरातच थांबण्याचं, गर्दी न करण्याचं, सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या आवाहनानुसार आम्हीदेखील सामाजिक अंतराचं भान राखून, सुरक्षितता बाळगून कर्तव्ये पार पाडत आहोत. किमान अधिकारी व सहकाऱ्यांना सोबत घेऊन, बैठका घेऊन विषय मार्गी लावत आहोत. केंद्र व राज्य सरकार, सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील प्रत्येक जण जोखीम पत्करुन आज कर्तव्य पार पाडत आहेत. नागरिकांनी घरातच थांबून साथ द्यावी, ही त्यांची अपेक्षा आहे. 

संयम दाखवा

नागरिकांनी दाखवलेला संयम, सहकार्यामुळेच राज्यातील काही जिल्हे आजही कोरोनामुक्त आहेत. नांदेड, सांगलीसारखे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्यापासून बोध घेऊन आपला जिल्हाही कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करुया. आपण सर्वांनी पुढचे काही दिवस घरातच थांबण्याचा निर्धार केल्यास कोरोनाच्या लढाईत विजय नक्की आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यात, मालेगावसारख्या शहरात पुढचे काही दिवस टाळेबंदी नियमांचं मनापासून, स्वयंशिस्तीने काटेकोर पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

हेही वाचा - तूर्तास मद्यविक्री नाहीच, मुंबईत ३ मे पर्यंत बंदी कायम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा