मुंबई - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाविरोधात मुंबईतल्या दोन वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. जमशेद मिस्त्री आणि जब्बार सिंग यांनी याप्रकरणात कोर्टानं दखल घ्यावी, अशी याचिका दाखल केलीय. या निर्णयामुळे नागरिकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतोय. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय सरकारनं मागे घ्यावा, अशी मागणी दोघांनी केलीय.