मध्य प्रदेशमधील (madhya pradesh congress government) व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी तेथील राजकीय अस्थिरतेवर भाष्य करताना भाजपला टोला हाणला आहे.
Sanjay Raut, Shiv Sena on political situation in Madhya Pradesh: BJP tried to form govt in Maharashtra too but failed. No such operation will be successful here. Surgeons like us are sitting here in operation theatre. If anyone comes to do it, he himself will be operated upon. pic.twitter.com/dtLM8VRnwG
— ANI (@ANI) March 11, 2020
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (rahul gandhi) यांचे विश्वासू आणि मध्य प्रदेशमधील वजनदार नेते ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) यांनी काँग्रेसला (INC) सोडचिठ्ठी देत बुधवारी दुपारी भाजपात (bjp) प्रवेश केला. त्याआधी ज्योतिरादित्य यांच्या २० हून अधिक समर्थक आमदारांनी आमदारकीचे राजीनामे दिल्याने मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार अस्थिर झालं आहे.
महाराष्ट्राची 'पाॅवर' वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वी फसले आहे.त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला.मधयप्रदेशचा वायरस महाराष्ट्रत घुसणार नाही. चिंता नसावी.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 11, 2020
जय महाराष्ट्र
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही भाजपचं ‘आॅपरेशन लोटस’ (operation lotus) यशस्वी होईल का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी संजय राऊत (sanjay raut) यांना विचारला. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाने ऑपरेशन लोटसचा प्रयोग करुन पाहिला. मात्र १०० दिवसांपूर्वी हे आॅपरेशन फसलेलं आहे. कारण महाराष्ट्राची पाॅवर वेगळी आहे. महाविकास आघाडीने बायपास आॅपरेशन करून महाराष्ट्राला वाचवलं आहे.” असा टोला राऊत यांनी भाजपाला लगावला.