Advertisement

पहिल्या, दुसऱ्या लाटेतील चुकांची पुनरावृत्ती नको- उद्धव ठाकरे

अजूनही कोरोना संपलेला नाही. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेतील चुकांची पुनरावृत्ती आता होता कामा नये. सारखा सारखा लॉकडाऊन आपल्याला परवडणार नाही.

पहिल्या, दुसऱ्या लाटेतील चुकांची पुनरावृत्ती नको- उद्धव ठाकरे
SHARES

अजूनही कोरोना संपलेला नाही. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेतील चुकांची पुनरावृत्ती आता होता कामा नये. सारखा सारखा लॉकडाऊन आपल्याला परवडणार नाही. महाराष्ट्रातील (maharashtra) गावांगावामध्ये कोरोनामुक्तीची लोकचळवळ निर्माण करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक, कोकण आणि पुणे विभागातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी तिन्ही विभागातील सर्व जिल्ह्यातील सरपंचांनी त्यांच्या त्यांच्या गावात कोरोनामुक्तीसाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.  

गर्दी नकोच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले की, सर्व गावांनी आपले गाव, आपला तालुका, आपला जिल्हा आणि त्या माध्यमातून संपूर्ण राज्य कसे कोरोनामुक्त होईल यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. हे काम चळवळीच्या स्वरूपात करावे. जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत गावकरी सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळतील याची काळजी घ्यावी. गावात कोठेही सभा, समारंभ, लग्नसोहळे, मोर्चे, आंदोलने यासारखी गर्दी जमवणारे कार्यक्रम होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.

गावात काम करणारे सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी हेच गावच्या व्यवस्थेच्या पाठकणा आहेत. या सर्वांनी कोरोनामुक्तीसाठी आतापर्यंत भरीव काम केलं आहे. आता तिसरी लाट थोपवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन चळवळीच्या स्वरूपात काम करावं आणि कोरोनाला (coronavirus) गावातून हद्दपार करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

हेही वाचा- १८ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना केंद्राकडून मोफत लस

ग्रामीण भागाला फटका

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) म्हणाले की, पहिली लाट ओसरल्यानंतर आपण थोडेसे गाफील राहिलो. त्यामुळे दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागाला मोठा फटका बसला. आता तिसरी लाट येणार नाही यासाठी सर्व पातळ्यांवर कार्यवाही करणं गरजेचं आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण होईल यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा. म्युकरमायकोसीसचं नवीन आव्हान आपल्यासमोर आलं आहे. यालाही रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा.  

मास्क हवाच

टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले की, कोरोना अजूनही आहे याची जाणीव ठेवूनच आपल्याला वागावं लागेल. अजूनही अलर्ट, रेड अलर्टवर रहावं लागणार आहे. लोकांनी अजूनही कोरोनाबाबत थोडाही संशय आला तर टेस्ट करून घ्यावी, वेळीच दवाखान्यात दाखल व्हावं. कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण करून घ्यावं. कोरोना हा छोटासा पण चिवट विषाणू आहे. त्याने आता रूप बदललं आहे. दुसरी लाट अजून गेलेली नाही, तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता आहे. त्यातच पावसाळी आजारही येऊ शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घ्यावी. मास्क हेच सर्वात प्रभावी लसीकरण आहे. जोपर्यंत संपूर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत मास्क खाली करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा