Advertisement

भोंग्यांबाबत पोलीस प्रमुखांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले 'हे' आदेश

भोंग्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

भोंग्यांबाबत पोलीस प्रमुखांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले 'हे' आदेश
SHARES

भोंग्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी यानंतर पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना महत्वाचे आदेश दिले आहेत. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यासंदर्भात एकत्रित धोरण ठरवा, असे आदेश दिले आहेत. हे धोरण राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी ठरवावे, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. जातीय तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई करावी, असेही आदेश त्यांनी दिले आहेत.

याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त एकत्रित बसून एक निर्णय घेणार घेतील, गाईडलाईन्स तयार करतील अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, राज्यासाठी एक दोन दिवसात एकत्रित असे धोरण ठरवले जाईल. मुंबईसह राज्यासाठी नोटीफिकेशन काढले जाईल आणि त्यातून नियमावली जाहीर करण्यात येईल.

मी अनेकदा सांगितले आहे की, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. जाणीवपूर्वक कोणाकडून प्रयत्न झाला तर आणि त्याच्यात तो दोषी आढळला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल मग ती संघटना असो, व्यक्ती असो किंवा आणखी कोणीही असो, असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. ते म्हणाले की, भोग्यांचा विषय हा अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला आहे. जर तुम्ही पाच वेळा भोंगे लावणार असाल, तर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा. सध्या रमजान सुरु असल्यामुळे काही सांगायचे नाही आहे. पण ३ तारखेपर्यंत यांना समजले नाही आणि देशातील कायद्यापेक्षा, सर्वोच्च न्यायालयापेक्षा स्वत:चा धर्म, लाऊडस्पीकर मोठे वाटत असतील, तर जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे.

मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत. कोणत्याही हाणामारी नको आहे. शांतता भंग करण्याची इच्छाही नाही. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही. पण जर लाऊडस्पीकरवर लावणार असतील, तर आमच्याही आरत्या त्यांना ऐकाव्या लागतील, असेही राज ठाकरे म्हणाले.



हेही वाचा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना धमकीचा फोन, Z+ सुरक्षेची मागणी

महाराष्ट्रातील 'या' भागात जातीय हिंसाचारामुळे कलम १४४ लागू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा