महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील वादात आता नव्या प्रकरणाची भर पडली आहे. राज्य सरकारच्या विमानाने प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने राज्यपालांना खासगी विमानाने देहरादून पर्यंतचा प्रवास करावा लागला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी उत्तराखंडमध्ये निघाले होते. या प्रवासासाठी ते सरकारी विमानाचा वापर करणार होते. परंतु त्यांच्या प्रवासाला परवानगी मिळाली नसल्याचं सांगण्यात आल्याने राज्यपालांना पुन्हा परतावं लागलं. त्यामुळे राज्यपाल आणि त्यांच्यासोबत असलेले अधिकारी खासगी विमानानं उत्तराखंडला निघाले, अशी माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.
या घटनेची माहिती होताच भाजपकडून (bjp) महाविकास आघाडी सरकारवर तीव्र शब्दांत टीका करण्यात येत आहे. राज्यपालांना विमानातून खाली उतरायला लावून सरकारने त्यांचा अवमान केल्याचा आरोप भाजपकडून केला जाऊ लागला आहे.
हेही वाचा- राज्यपाल न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देणार नाहीत- अजित पवार
Maharashtra Guv Bhagat Singh Koshyari was scheduled to go to Dehradun today by a state govt plane However when Governor reached Mumbai Airport, he was told that permission to fly him in that plane has not been given. He has now booked a commercial flight to Dehradun.
— ANI (@ANI) February 11, 2021
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, राज्यपालांना कोणत्या कारणामुळे सरकारी विमानाने जाऊ दिलं नाही, त्याची माहिती घेण्यात येत आहे. त्यांना परवानगी नाकारण्याचं कारण काय? विमानात काही तांत्रिक अडथळा होता का?, एटीसीची प्रक्रिया पूर्ण झाली होती का?, या सगळ्यांची माहिती घेतली जाईल, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (aslam shaikh) यांनी स्पष्ट केलं. सोबतच राज्यपालांचा आम्ही सन्मानच करतो, त्यांचा अवमान होणार नाही, असंही शेख यांनी सांगितलं.
(maharashtra government denied permission to governor bhagat singh koshyari to fly in government plane)
हेही वाचा- काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद निश्चित? मंत्रिमंडळातही फेरबदलाची शक्यता