Advertisement

मुंबईतल्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विकास आराखडा तयार करावा : अमित देशमुख

५ ऑक्टोबर मंत्रालयात गड- किल्ल्यासंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

मुंबईतल्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विकास आराखडा तयार करावा : अमित देशमुख
SHARES

मुंबईतील सहा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी एकत्रित विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. मुंबईतील शिवडी, वरळी, वांद्रे, धारावी, सेंट जॉर्ज आणि माहिम अशा सहा किल्ल्यांसाठी हा विकास आराखडा तातडीनं तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

५ ऑक्टोबर मंत्रालयात गड- किल्ल्यासंदर्भात अमित देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. तसंच १८ संरक्षित किल्ल्यांच्या संवर्धनाबाबतचा अहवालही तातडीनं द्यावा असेही निर्देश देण्यात आले आहेत.

“मुंबईतील सर्व सहा किल्ल्यांचा विकास आराखडा एकत्रितपणे तयार करण्यात यावा. त्याचसोबत, येत्या ८ दिवसांत राज्यातील एकूण सागरी किल्ल्यांसाठी विकास आराखडा आणि राज्य संरक्षित एकूण ६० किल्ल्यांचा विकास आाराखडा असे तीन वेगवेगळे विकास आराखडे सादर करण्यात यावेत.

लातूर जिल्हयातील औसा आणि उद्गीर किल्ल्यांच्या संवर्धन कामासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबाबतची पुढील कार्यवाही तातडीनं करण्यात यावी”, अशाही सूचना अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.

या किल्ल्यांची डागडुजी, दुरुस्ती आणि संवर्धनाची कामं ही पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत करण्यात येत आहेत. मात्र, असं असलं तरीही वित्तविषयक तज्ञ सल्लागार नेमून या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वित्त संस्थांकडून कर्ज पुरवठा कसा होऊ शकेल? याबाबतची शक्यता तपासून घ्यावी. या तज्ञ सल्लागारांनी दिलेला अहवाल त्यानंतर सरकारला सादर करावा”, असंही अमित देशमुख म्हणाले.



हेही वाचा

जोपर्यंत हे सत्तेत आहेत, तोपर्यंत रस्ते सुधारणार नाहीत - अमित ठाकरे

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, राज ठाकरेंची मागणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा