केंद्र सरकारने सोमवारी मानक कार्यप्रणाली जारी करत अटी-शर्थींच्या आधारे १५ आॅक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शाळा-काॅलेज केव्हा सुरू होणार असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मात्र जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात एकही महाविद्यालय सुरू करणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. (maharashtra government will not allowed to start college again until covid 19 situation not coming under control says uday samant)
सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठातील बैठकीनंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधताना उदय सामंत यांनी ही माहिती दिली. यावेळी सावंत यांनी सांगितलं की, विद्यार्थ्यांच्या सुविधेनुसार आॅफलाइन आणि आॅनलाइन अशा दोन्ही प्रकारे परीक्षांचं आयोजन विद्यापीठांकडून करण्यात येत आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही, याची विषेश दक्षता घेतली जाईल, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी चिंता करू नये. आॅफलाइन परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी केली जाईल. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. परीक्षा आणि निकाल वेळेत लावण्यासाठी सर्व विद्यापीठं कटिबद्ध आहेत.
हेही वाचा- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी सकारात्मक- उदय सामंत
सोबतच राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांची भरती करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याचं देखील उदय सामंत यांनी सांगितलं.
हेही वाचा- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी सकारात्मक- उदय सामंत