अनुसुचित जाती, जमातींच्या आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ देण्यासाठी मंगळवारी विधानसभेचं एक दिवसीय विशेष अधिवेशन भरवण्यात आलं आहे. यावेळी सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिभाषणादरम्यान सांगितलं.
काय म्हणाले राज्यपाल?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी हे सरकार काम करेल. तसंच महिला सुरक्षेसाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारनं प्रयत्न केले आहेत. सरकारनं शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ केल्याचं राज्यपालांनी सांगितलं.
या अधिवेशनाच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवनियुक्त मंत्र्यांची ओळख करून दिली.
हेही वाचा-
महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं उद्योजकांना आश्वासन
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये गुप्त बैठक