मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदरमध्ये दोन गटात झालेल्या वादाप्रकरणी 13 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
काय प्रकरण आहे?
रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास तीन कार आणि तेवढ्याच मोटारसायकलवरून 10 ते 12 जणांचा टोळका नया नगर येथून रॅली काढत होता. सोमवारी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रॅलीदरम्यान, गट भगवान रामाच्या स्तुतीसाठी घोषणा देत होता.
काही लोकांनी घोषणाबाजी केली आणि फटाके फोडले, त्यानंतर स्थानिक लोकांचा एक गट लाठ्या-काठ्या घेऊन बाहेर पडला. त्यांच्या रॅलीत आलेल्या लोकांशी वाद झाला आणि त्यांनी त्यांच्या वाहनांवर हल्ला केला.
सध्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक पोलिस कर्मचार्यांव्यतिरिक्त दंगल नियंत्रण पोलिस (आरसीपी) ची तुकडीही तैनात करण्यात आली आहे.
आमदार प्रताप सरनाईक काय म्हणाले?
याप्रकरणी शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या प्रकरणातील सर्व आरोपींना 25 जानेवारीपर्यंत पोलिसांनी अटक केली नाही तर 25 जानेवारीला मीरा भाईंदर बंदची हाक देणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
हेही वाचा