Advertisement

राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन, पण…

वीज बिलप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोला असा सल्ला राज्यपालांनी राज ठाकरेंना दिला होता. त्यानुसार राज ठाकरे यांनी शरद पवारांना फोन केल्याचं समोर आलं आहे.

राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन, पण…
SHARES

राज्यातील वाढीव वीज बिलाच्या (electricity bill hike) प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोला असा सल्ला राज्यपालांनी राज ठाकरेंना दिला होता. त्यानुसार राज ठाकरे यांनी शरद पवारांना (ncp chief sharad pawar) फोन केल्याचं समोर आलं आहे.

राज ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेऊन वाढीव वीज बिल आणि दूध दराच्या मुद्द्यांवर चर्चा केली. लॉकडाऊनमुळं (lockdown) अनेकांचे रोजगार गेले आहेत. सर्वसामान्यांच्या हाती पैसे नाहीत. अशा स्थितीत ज्यांना महिन्याला हजार वीज बिल यायचं त्यांना १० हजार बिल आलं आहे. ज्यांना ५  हजार बिल यायचं त्यांना २५ हजार बिल आलं आहे. वीज कंपन्यांनी यावर तोडगा काढावा. राज्य सरकारनं त्यासाठी प्रयत्न करावा व राज्यपालांनी या संदर्भात सरकारला सूचना कराव्यात, अशी मागणी राज ठाकरे यांनी भगतसिंह कोश्यारींकडे (governor bhagat singh koshyari) केली. (mns chief raj thackeray contact sharad pawar over electricity bill hike problem during lockdown in maharashtra)

हेही वाचा- वाढीव वीजबिलासंदर्भात राज ठाकरेंची राज्यपालांशी चर्चा

तर, वीज बिलाबाबत मनसेनं आंदोलनं केली, बेस्ट, अदानीसह (best & adani) इतर वीज कंपन्यांचे प्रतिनिधी भेटून गेले. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) मान्यता दिल्यास वीज बिलात सवलत देण्याची तयारी या कंपन्यांनी दाखवली. त्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने एमईआरसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनीही सकारत्मकता दाखवली. परंतु अजूनही सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही. केवळ प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जातं, असं राज ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. 

शिवाय याप्रकरणी शरद पवार यांच्याशी बोला, असा सल्ला राज्यपालांनी दिल्याचंही सांगितलं. त्यानुसार राज ठाकरे यांनी पवारांना फोन केल्याची माहिती खुद्द पवारांनीच एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. परंतु राज ठाकरेंना भेटण्याबाबत काहीही ठरलेलं नाही, कारण मी बाहेरगावी चाललोय, असं पवारांनी स्पष्ट केलं.

आता वीज बिलाच्या मुद्द्यावर दोघांमध्ये केव्हा भेट होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

हेही वाचा- कमतरता प्रश्नांची नसून निर्णय घेण्याची आहे - राज ठाकरे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा