आज तर फक्त मोर्चाच (Morcha) काढला आहे, जास्त नाटक करालं, तर गप्प न बसता दगडाला-दगडाने (Stone) आणि तलवारीला तलवारीने (Sword) उत्तर देऊ, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navanirman Sena Chief Raj Thackeray) यांनी सुधारीत नागरिकत्व कायदा (CAA) आणि एनआरसीला (NRC) विरोध करण्यासाठी मोर्चे काढणाऱ्यांना इशारा दिला. आझाद मैदानात (Azad Maidan) केलेल्या भाषणात ते बोलत होते.
भारत फक्त आपला देश आहे. बांग्लादेशी, पाकिस्तानी आणि नायजेरियन घुसखोरांचा नाही. #मनसे_महामोर्चा https://t.co/xLh88bCygX
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 9, 2020
देशातील बांगलादेशी (Bangladesh) आणि पाकिस्तानी (Pakistan) घुसखोरांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी मनसेतर्फे रविवारी ९ फेब्रुवारी रोजी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मरिन लाइन्स (Marine lines) येथील हिंदू जिमखाना (Hindu Gymkhana) ते आझाद मैदानादरम्यान (Azad maidan) काढण्यात आलेल्या मोर्चासाठी राज्यभरातून हजारो मनसैनिक सहभागी झाले होते. या मोर्चाचं नेतृत्व स्वत: राज ठाकरे यांनी केलं. त्यांच्यासोबत मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आदी नेते उपस्थित होते.
आझाद मैदानात पोहोचल्यावर मोर्चाचं (Morcha) सभेत रूपांतर झालं. यावेळी केलेल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले,
हेही वाचा -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जयंत पाटील यांचा बालमोहन विद्यामंदिर शाळेत होणार सन्मान
आम्हाला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही- उद्धव ठाकरे