Advertisement

‘हे’ तर पळपुटं सरकार, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर असताना आणि मराठा आरक्षणासंदर्भात घोळ घातलेला असताना आता विधिमंडळ अधिवेशनापासून पळ काढण्याचं काम हे सरकार करत आहे, असा घणाघाती आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला.

‘हे’ तर पळपुटं सरकार, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
SHARES

शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर असताना आणि मराठा आरक्षणासंदर्भात घोळ घातलेला असताना आता विधिमंडळ अधिवेशनापासून पळ काढण्याचं काम हे सरकार करत आहे, असा घणाघाती आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ एक दिवसाचं अधिवेशन या सरकारने घेतलेलं आहे. कारण पहिल्या दिवशी केवळ शोक प्रस्ताव मांडले जातात. त्यामुळे उद्या केवळ ६ तासाचं अधिवेशन असणार आहे. त्यातही १० विधेयकं या सरकारने कामकाजात दाखवलेली आहेत. याचा अर्थ चर्चाच करायची नाही. केवळ वेळ काढून न्यायचा. मागच्या वेळी सत्तारूढ पक्षानेच गोंधळ घालून चर्चा होऊ दिली नव्हती. लोकांचे प्रश्न मांडता येऊ नये, शेतकऱ्यांना न्याय मिळू नये. मराठा-ओबीसी समाजाचे प्रश्न ऐरणीवर येऊ नयेत, म्हणून हे सरकार अधिवेशनातून पळ काढत आहे.

हेही वाचा- लोकल सुरू केल्यावर कोरोनाचा त्रास नाही पण..? सुधीर मुनगंटीवार संतापले

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी भाजपवर आणीबाणी लादल्याचा आरोप केला होता. त्यावर विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा तर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर बोललं पाहिजे. इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का?

इथल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तुम्ही त्यांना ५० आणि २५ हजार रुपयांचं वचन दिलं होतं. पण एक फुटकी कवडीही त्यांना दिलेली नाही. बोंडअळी, खोडकिडीने त्रासलेल्या शेतकऱ्याला एक नवा पैसा सरकारने दिलेला नाही. तुम्ही अमेरिका, रशिया, दिल्लचं बोलता, पण महाराष्ट्रात तुम्ही काय दिवे लावले ते सांगा, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

महाराष्ट्रात इतकी वाईट परिस्थिती आहे की, मराठा आंदोलकांना घरात घुसून मारू लागले आहेत. त्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे. म्हणजे मराठा समाजाने आंदाेलनही करू नये अशाप्रकारची आणीबाणी लादली आहे, त्याच्यावर ते बोलत नाहीत. कारण महाराष्ट्रावर बोललं की ते उघडे पडतात म्हणून दिल्लीवर बोलणं चाललं आहे. दिल्लीत तर रोज आंदोलन सुरू आहे, कुणीही आंदोलकांना रोखलेलं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(opposition leader devendra fadnavis criticises thackeray government over short maharashtra assembly winter session)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा