''भारत अंतराळातील महाशक्ती बनला आहे, भारताने आज अंतराळात एक लाइव्ह सॅटेलाइट उदध्वस्त केलं, अशी क्षमता प्राप्त करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला'' असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. देशाला संबोधित करताना ते बोलत होते. बुधवारी सकाळी त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देशाला संबोधित करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असतानाच मोदी नेमकं काय बोलणार? यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं होत.
हमारे वैज्ञानिकों ने अंतरिक्ष में 300 किमी दूर LEO (Low Earth Orbit) में एक लाइव सैटेलाइट को मार गिराया है।
— BJP (@BJP4India) 27 March 2019
ये लाइव सैटेसाइट जो कि एक पूर्व निर्धारित लक्ष्य था, उसे एंटी सैटेलाइट मिसाइल (A-SAT) द्वारा मार गिराया गया है : पीएम नरेन्द्र मोदी #MissionShakti pic.twitter.com/T5CKuiiZIx
पंतप्रधान मोदी १२.३० वाजेच्या सुमारास देशवासीयांना संबोधित करण्यासाठी कॅमेऱ्यासमोर आले. त्यानंतर मिशन शक्तीअंतर्गत क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उपग्रह पाडण्यात भारताला यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या अभियानाच्या यशस्वीतेमुळे भारत अंतराळातील महाशक्ती बनल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. जवळपास १५ मिनिटं त्यांनी भाषण केलं.
भारताच्या ए-सॅट क्षेपणास्त्रानं अंतराळात ३०० किलोमीटर उंचीवरील LEO (Low Earth Orbit) कार्यरत उपग्रह अवघ्या ३ मिनिटांत पाडला. ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (DRDO)तील शास्त्रज्ञांची सर्वोत्तम कामगिरी असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताने ही मोहीम कोणत्याही देशाविरुद्ध राबवली नाही. तर देशातील नागरीक देशाची सुरक्षा यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.
आम्हाला जगात शांतता कायम ठेवायची आहे, आमचा युद्धाचा हेतू नाही. यातून भारताने अंतराळ क्षेत्रात मोठी झेप असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कृषी संरक्षण मनोरंजन, हवामान,शिक्षण, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांत आपल्याला उपग्रहांचा फायदा मिळत आहे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा -
पंतप्रधान मोदींनी केली 'ही' मोठी घोषणा