विरोधी पक्षाचे नवनिर्वाचित नेते राहुल गांधी (rahul gandhi) पुढील महिन्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. ते सोलापूर (solapur) जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठलवारीत सामील होण्याची शक्यता आहे.
तसेच राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)हे वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. दोन्ही नेते स्वतंत्रपणे किंवा एकत्र सहभागी होऊ शकतात.
या यात्रेसाठी लाखो वारकरी भाविक 21 दिवसांसाठी पायी पंढरपूरला (Pandharpur) निघाले आहेत.
नवी दिल्लीत पक्षाच्या आढावा बैठकीनंतर राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधीना वारीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आणि त्यांनी मान्य केले, असे कॉंग्रेसच्या अंतर्गत सुत्रांनी सांगितले.
शरद पवार यांनीही पुणे (pune) जिल्ह्यातील वारीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडीचे (I.N.D.I.A) दोन नेते एकत्र किंवा वेगळे सहभागी होतील याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.
भक्ती परंपरेत रुजलेली वारकरी चळवळ, पुण्याजवळील देहू (Dehu) येथील १७ व्या शतकातील संत तुकाराम महाराज यांचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत.
आषाढी एकादशीपूर्वी आळंदी (aalandi) आणि देहू येथून दरवर्षी लाखो वारकरी भक्त पंढरपूरच्या विठोबा मंदिरात पायी जात असतात. हे तीर्थक्षेत्र कोणत्याही जाती किंवा धर्माची पर्वा न करता सर्व सामाजिक स्तरातील लोकांना आकर्षित करते.
हेही वाचा