Advertisement

राज्यातील धार्मिक स्थळं उघडणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

राज्यातील धार्मिक स्थळं उघडण्यासाठी विरोधी पक्षाकडून होत असलेल्या दबावाला झुगारत आतापर्यंत हा निर्णय राखून ठेवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीनंतर धार्मिक स्थळं उघडण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यातील धार्मिक स्थळं उघडणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत
SHARES

राज्यातील धार्मिक स्थळं उघडण्यासाठी विरोधी पक्षाकडून होत असलेल्या दबावाला झुगारत आतापर्यंत हा निर्णय राखून ठेवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीनंतर धार्मिक स्थळं उघडण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत संवाद साधला, यावेळी त्यांनी हे संकेत दिले.

प्रार्थनास्थळांना उघडण्याच्या बाबतीत दिवाळीनंतर निर्णय घेऊ. मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिक नियमितपणे जातात. हा विषाणू ज्येष्ठ आणि सहव्याधी रुग्णांना अधिक धोकादायक असल्याने याबात अधिक काळजी घेऊन निर्णय घ्यावा लागत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

शहरी आणि ग्रामीण भागात स्वॅब (घशातील द्राव)  संकलन केंद्रे वाढवा, चाचण्या कमी करू नका. दुसऱ्या लाटेची तयारी करा, कर्मचारी व सुविधा यांची तयारी करून ठेवा. लस डिसेंबरअखेर किंवा एप्रिलमध्ये येईल असा अंदाज आहे. मात्र तोपर्यंत मास्क, हात धुवा, सुरक्षित अंतर हे नियम पाळले गेलेच पाहिजेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशा कडक सूचनाही उद्धव ठाकरे यांनी केल्या.

हेही वाचा- दिवाळीनंतर शाळा होणार, उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश

या विषाणूचा जेव्हा चंचूप्रवेश झाला तेव्हा आपण लॉकडाऊन केलं आणि आता हळूहळू सर्व खुलं करू लागलो आहे. त्यामुळे सुरुवातीला शहरात असलेला संसर्ग आता राज्यभर सर्वत्र पसरलाय. सुरुवातीच्या काळात विषाणूचा प्रसार मर्यादित ठिकाणी होता, मात्र आता ग्रामीण भागातसुद्धा रुग्ण सापडत आहेत. या सर्व कालावधीत उन्हाळा आणि पावसाळ्यात मोसमी आजार आढळले नाहीत, कारण आपण आरोग्यविषयक खबरदारी घेतली. मात्र आता थंडी आली आहे. या काळात कोविड व्यतिरिक्त इतर आजारही उफाळून येतात. विशेषत: ह्रदयविकार, न्यूमोनिया, अस्थमा, फ्ल्यू यासारख्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. फ्ल्यू आणि कोरोनातील फरकही कळला पाहिजे.

सर्व काही खुले केल्याने विशेषत: शासकीय कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. ती कमी करणे, त्यासाठी काही कल्पक उपक्रम राबविणे गरजेचं आहे. जनतेच्या खूप जास्त संपर्कात येणारे लोक, बस चालक-वाहक, सार्वजनिक व्यवस्थेतील कर्मचारी हे सुपर स्प्रेडर्स असू शकतील. त्यामुळे त्यांच्या चाचण्या लगेच करून घेण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरे यांनी दिल्या. 

(religious places will open after diwali says maharashtra cm uddhav thackeray)

हेही वाचा- दिवाळीनंतर पुढचे १५ दिवस जागरुकतेचे- उद्धव ठाकरे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा