Advertisement

...अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी : चाकणकर

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

...अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी : चाकणकर
SHARES

आजच्या महाराष्ट्र बंदवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Amruta Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला खोचक सवाल केला. त्याला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदला हाक दिली आहे. सरकारच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच 'आज वसुली सुरू आहे की बंद? 'असा खोचक सवाल ट्विट करत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला.

चाकणकर म्हणाल्या की, ‘वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी.’

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. 'महाविकास आघाडी प्रायोजित बंदचा चेहरा उघडा पडला आहे. कारण लखीमपूर प्रकरणात बंद करतात. पण राज्यातल्या शेतकऱ्यांना एका पैशांची मदत केली नाही.



हेही वाचा

''आज वसुली चालू आहे की बंद?'', अमृता फडणवीसांचा 'मविआ'ला टोमणा

वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा