Advertisement

गरिबांसाठी सरकार प्रयत्नशील - रामदास आठवले


गरिबांसाठी सरकार प्रयत्नशील - रामदास आठवले
SHARES

कॅन्सर हा आजार बरा होऊच शकत नाही असा गैरसमज आजही देशात आहे. पण देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कॅन्सरचे रुग्ण उपचारांसाठी टाटा मेमोरिअल रुग्णालयात येतात. त्यांच्यावर उत्तम उपचार करून त्यांना जीवनदान देण्याचे काम रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग करत असतो. त्याचप्रमाणे या रोगाचे निदान व्हावे यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव परळ (पू.) येथील टाटा रुग्णालयाच्या सभागृहात शुक्रवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.सामजिक प्रयत्नातून गरिबी नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या देशाच्या स्वातंत्र्यावर आधारित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकारदेखील असेच असल्याचा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल साठे, वरिष्ठ कार्मिक अधिकारी राजेंद्र जैस्वाल, किशोर होवाळे, गोरख अहिरे, नरेंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

टाटा मेमोरिअल सेंटर एससी, एसटी आणि ओबीसी एम्प्लॉईज असोशिएशन यांच्या वतीने गेल्या 20 वर्षांपासून सदर कार्यक्रमाचे आयोजन टाटा रुग्णालयात करण्यात येते. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून रुग्णांचे मनोरंजन आणि समाज प्रबोधनही करण्यात येते. या कार्यक्रमादरम्यान 100 रुग्णांना फळवाटप देखील करण्यात आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा