मुंबई - 'पंचवीस वर्षे ज्यांना मित्र मानले त्यांनी पाठी मागून वार केले. पण हिंमत असेल तर आता अंगावर या, मग आम्ही दाखवू सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय ते', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी झालेल्या दसरा मेळाव्यात भाजपला खुले आव्हान दिले.
'पालिका निवडणुकांमध्ये सोबत यायचे असेल तर या, आम्ही कटोरा घेऊन भीक मागणार नाही', असे म्हणत पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्यास शिवसेना तयार असल्याचे स्पष्ट संकेत ठाकरे यांनी यावेळी दिले. शिवाजी पार्क होणाऱ्या शिवसेनेच्या 50 व्या दसरा मेळाव्याकडे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे शिवसैनिकांसह मुंबईकरांचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे पंतप्रधानांसह मित्रपक्ष भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चिमटे काढले.
सर्जिकल स्ट्राईकचे जोरदार समर्थन करतानाच ठाकरे यांनी सर्जिकल स्ट्राईकला विरोध करणाऱ्यांवर टीका केली. तसेच मराठा आरक्षण, अॅट्राॅसिटी, युती, कोपर्डी अशा अनेक प्रश्नांना पक्षप्रमुखांनी हात घातला. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या आक्रमकतेची अपेक्षा शिवसैनिक करत होते ती आक्रमकता आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणात दिसून आली नाही. त्यामुळे सावधपणे उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडल्याने शिवसेनला या मेळाव्यातून बळ मिळेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे