राज्यात ७० हजार रिक्त पदांची (Vacancy) भरती (Recruitment) करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत या जागा भरण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे राज्यातील बेरोजगारांसाठी ही मेगाभरती सुवर्णसंधी असणार आहे.
२०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ७२ हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २०१८ मध्ये ३६ हजार पदं तर २०१९ मध्ये ३६ हजार पदं भरली जाणार होती. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही मेगाभरती झाली नाही. आता राज्यात शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) चं सरकार स्थापन झालं आहे. नवीन सरकारमधील मंत्र्यांनी या पदांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी असा आग्रह धरला आहे. त्यानुसार राज्य सरकार आता ही भरती प्रक्रिया सुरु करणार आहे.
ग्रामविकास, गृह, कृषी, पशू व दुग्धसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास आणि आरोग्य विभागात सर्वाधिक रिक्त पदे आहेत.
विभाग जागा
ग्रामविकास 11000
गृह विभाग 7111
कृषी विभाग 2500
पशु व दुग्ध संवर्धन 1047
सार्वजनिक बांधकाम 8330
जलसंपदा 8220
जलसंधारण 2433
नगरविकास 1500
आरोग्य 10,560
हेही वाचा -