Advertisement

मी स्वत: अनुभवलीय मुंबईतली नाईटलाइफ, प्रकाश आंबेडकरांनी दिलं समर्थन

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांनी पर्यटन आणि पर्यावरणमंत्री ​आदित्य ठाकरे​​​ यांच्या संकल्पनेतील ‘नाईटलाइफ’ला पाठिंबा दिला.

मी स्वत: अनुभवलीय मुंबईतली नाईटलाइफ, प्रकाश आंबेडकरांनी दिलं समर्थन
SHARES

ज्यांना हे शहर माहीत नाही, तेच या शहरावर बोलतात, ज्यांचं बालपण या शहरात गेलंय, ज्यांना हे शहर माहितेय, तेच या ‘नाईटलाइफ’चे ( night life in mumbai) पुरस्कर्ते असल्याची मला जाणीव आहे,’ असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांच्या संकल्पनेतील ‘नाईटलाइफ’ला पाठिंबा दिला.

मुंबईत रात्रीच्या वेळेतही माॅल, दुकाने आणि हाॅटेल-रेस्टाॅरंट इ. व्यावसायिक ठिकाणं सुरू राहावीत, यासाठी आदित्य ठाकरे आग्रही आहेत. त्यासाठी शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे (mumbai police commissioner sanjay barve), मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी (bmc commissioner pravin pardeshi) आणि हाॅटेल-रेस्टाॅरंट, माॅल्सच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली आणि या बैठकीनंतर मुंबईतील अनिवासी भागात २७ जानेवारीपासून हाॅटेल-रेस्टाॅरंट आणि माॅल्स (hotels and malls) २४x७ सुरू ठेवता येतील, अशी घोषणा केली. 

हेही वाचा- मुंबई पोलीस घोड्यांवरून घालणार गस्त…

मात्र या संकल्पनेवर भाजपने (bjp) आक्षेप घेतला. मुंबईत २४X७ हाॅटेल आणि माॅल्स सुरू झाली, तर मुंबई पोलिसांवर अतिरिक्त भार येईल. शिवाय मुंबईत बार आणि लेडिज बारला प्रोत्साहन मिळेल, असा दावा भाजप नेते आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी केला.

तर गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांनी पोलिसांवरील ताणाचा मुद्दा उपस्थित करत २२ जानेवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेऊ. तोपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही असं, सांगितल्याने शिवसेनेच्या (shiv sena) गोटात अस्वस्थता पसरली. पण रात्री आदित्य यांनी फोन करून चर्चा करताच देशमुख यांनी अनिवासी भागातील व्यावसायिक हाॅटेल-माॅल सुरू ठेवण्यास हरकत नसल्याचा खुलासा केला. 

नाईटलाइफवरून मुंबईत चर्चा सुरू असताना अॅड. प्रकाश आंबेडकर ( prakash ambedkar) यांनीही त्यावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी स्वत: मुंबईतील नाईटलाइफमध्ये जगलो आहे. त्यामुळे नाईटलाइफमुळे पोलिसांवर फार ताण येतो, असं मला वाटत नाही. मुंबईत एक वर्ग असा आहे, ज्याला सोशल लाइफ नाही आणि त्याचं सोशल लाइफ हे नाईटलाइफ असतं. तेव्हा मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाला साेशल लाइफ असावं की नसावं, तर माझं म्हणणं आहे असलं पाहिजे. मग त्याच्या सोईने असलं पाहिजे. त्याची सोय ही रात्रीही आहे, त्यामुळे ते सुरू झालं पाहिजे.

हेही वाचा- नाईटलाइफवरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?

ते पुढे म्हणाले की, ज्यांना हे शहर माहीत नाही, तेच या शहरावर बोलतात, ज्यांचं बालपण या शहरात गेलंय, ज्यांना हे शहर माहितेय, तेच या ‘नाईटलाइफ’चे पुरस्कर्ते असल्याची मला जाणीव आहे,’ असं म्हणत त्यांनी नाईटलाइफच्या संकल्पनेला पाठिंबा दिला. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा