भोंग्यांवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. भोंगे धार्मिक नाही तर सामाजिक विषय असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
“सगळ्या धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरलेच पाहिजे. ते भोंगे मंदिरांवरील असले तरी उतरवलेच गेले पाहिजेत,” असं मत राज ठाकरे यांनी रविवारच्या सभेत व्यक्त केलं होतं.
राज ठाकरे यांच्या वक्तव्याची दखल घेत साईबाबा संस्थानानं मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डीच्या साई मंदिरातही (Shirdi Sai Mandir) पहाटेची काकड आरती आणि रात्रीची शेजारती लाऊडस्पिकरविना झाली आहे.
इतिहासात प्रथमच श्री साईबाबा मंदिरातील रात्रीची आणि सकाळची आरती लाऊडस्पिकर विनाचं झाली आहे. याच बरोबरीने शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सर्व मशिदीत नमाज झाली परंतु अजानसाठी कोणीही स्पिकरचा वापर केला गेला नाही. शिर्डीत एकूण सहा मशिदी असून ४ मे च्या सकाळची अजाण करण्यात आली. मात्र त्यासाठी ध्वनीक्षेपकांचा वापर गेला नाही.
'या' वेळेत लाऊडस्पिकर बंद
३ मेला शिर्डी पोलिसांनी साईबाबा संस्थानला पत्राद्वारे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत लाऊड स्पिकर वापरण्यास परवानगी नसल्याचं सांगितलं. तसंच या वेळेत साईमंदीरावरील लाऊड स्पिकर वापरु नये, असे आदेश दिल्यानं ३ मे ला रात्री साईमंदिरात झालेला शेजआरती आणि ४ मेला पहाटेच्या काकड आरती स्पिकरवरून प्रसारीत करण्यात आली नाही.
भोंगावाद आणि त्याच बरोबरीनं सुप्रीम कोर्टाचे निर्देश यामुळे साईबाबा प्रतिस्थानानं हा निर्णय घेतला आहे. साईबाबा संस्थानाने सामंजस्याची (Shirdi News) भूमिका घेत इतर देवस्थान आणि प्रार्थनास्थळांपुढे आदर्श ठेवला आहे.
हेही वाचा