Advertisement

नवी मुंबईत उभारणार तिरुपतीचे भव्य मंदिर!

महाराष्ट्रातील जनतेला यापुढे बालाजीच्या दर्शनासाठी तिरुपतीला जाण्याची गरज भासणार नाही.

नवी मुंबईत उभारणार तिरुपतीचे भव्य मंदिर!
SHARES

महाराष्ट्रातील जनतेला यापुढे बालाजीच्या दर्शनासाठी तिरुपतीला जाण्याची गरज भासणार नाही. कारण बालाजी तिरुपती मंदीर महाराष्ट्रात येणार आहेत.

महाराष्ट्र सरकारनं नवी मुंबईतील तिरुमला तिरुपती देवस्थानम मंडळाला भगवान व्यंकटेश्वर मंदिरासारखे मंदिर बांधण्यासाठी जागा दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने एक निवेदन प्रसिद्ध करून तिरुपती मंदिर व्यवस्थापनाला नवी मुंबईत बालाजीचे तिरुपतीसारखे मंदिर बांधण्यासाठी जागा देण्यात आल्याची माहिती दिली आहे. सिडकोच्या निवेदनानुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी नवी मुंबईजवळ बांधण्यात येणाऱ्या विमानतळाजवळ जमीन मागण्यासाठी पत्र लिहले होते.

सुब्बा रेड्डी यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिडकोला तसे आदेश दिले होते. सिडकोनं तिरुपती देवस्थानम बोर्डाला दिलेला भूखंड प्रत्यक्षात यापूर्वी मुंबई ट्रेन्स हार्बर लाइन सी-ब्रिज प्रकल्पाला देण्यात आला होता. आता ही जमीन २०२३ पर्यंत सिडकोकडे परत येणार आहे.

नवी मुंबईतील उलवेजवळ उभारण्यात येणाऱ्या विमानतळाजवळ भगवान व्यंकटेश्वराचे मंदिर असणार आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण होताच ते सर्वसामान्यांसाठी खुले केले जाईल.

नवी मुंबईतील व्यंकटेश्वराच्या मंदिरानंतर आता लोकांना बालाजीच्या दर्शनासाठी आंध्र प्रदेशातील तिरुपती इथं जावे लागणार नाही. नवी मुंबईतच भाविकांना बालाजीचे दर्शन होणार आहे.

याशिवाय महाराष्ट्र सरकारनं बोरिवली येथील स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टच्या भाडेपट्ट्याला आणखी ३० वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे.



हेही वाचा

जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ३००० पोस्ट डिलीट - मुंबई पोलिस

महाराष्ट्रात लोडशेडिंगची समस्या दूर होणार, 'हा' आहे सरकारचा मास्टर प्लॅन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा