अन्न हे पूर्णब्रह्म असं आपण नेहमी म्हणत असतो. पण खरंच आपण अन्नाला पूर्णब्रह्म मानतो का? असं विचारायचं कारण म्हणजे भारतात आजही अन्नाची नासाडी करून त्याचा अपमान केला जातो. हे चित्र एकीकडे असताना कित्येकांना एक वेळचं जेवण देखील मिळत नाही. हाच विचार करून चिनू कवात्रा, अक्षय मांढरे या तरूणांनी 'रोटी घर' ही संकल्पना राबवली. लहानग्यांच्या पोटाची आग शमवणारे अन्नदाता म्हणून आज हे दोघं ओळखले जातात.